Translate

Wednesday, December 7, 2011

With His Holiness The Dalai Lama

It was a shivering cold of 8 am of that day and already I was standing in the queue in front of a photo shop in Dharamshala. No wonder, I got the clue why all that rush glued to the little photo shoppe and it was for the photos which were needed to attach with the form to attain the permission letter to attend the teaching session by His Holiness The Dalai Lama. His Holiness The Dalai Lama...I was just enthralled when the branch security office confirmed my entry and handed over me permission letter to attend the lecture by the great spiritual guru H.H. The Dalai Lama. I don’t bother about the issues exist about Dalai Lama’s greatness, but I am sure he has some impressing intellect and word power with the charismatic personality, that is why he has been ruling over Tibetan minds and followers all over the world. I don’t care about the politics he is involved in but I salute to his struggle and courage and that’s the reason I was standing in the queue to have the entry I-card which was required for the lecture organised for Russian Buddhists.

Next day, I was really eager to go outside though it was pretty cold (but pleasant too as it is always pleasant in Dharamshala) morning with little sunshine around giving us enough warmth. My guide Manu Kapoor drove me toward the Namgyal monastery and promised me that he will wait around the market till the lecture gets over. I lined up for the entry. There was very strict security inside the monastery; I had to leave all my electronic gadgets before I entered the lecture hall. Volunteers gave me a white jute bag which had some literature, a Khata (white offering scarf), notepad and meditation mala for chanting.

I was amazed by the number of followers gathered there for the lecture, including the foreign followers, Russian Buddhists, locals and monks. I cornered one place under the roof which was very near to the entrance route of H.H and started reading the given material. I tried to ask one old lady sitting near me that why she was there. I wanted to know that magic woven by H.H. Dalai Lama, but I couldn’t understand her language. There were many lines of followers sitting on the floor and they came with their own sitting mat and a mug for tea. Though I was handed over the list of necessary things to carry to the lecture hall, I missed my sitting mat so I sat on my shawl. It was a nice feeling although; waiting for someone you have been thrived to see.

Suddenly all people started looking at the gate and H.H. The Dalai Lama came in with his close followers around. I wondered because no one made a screaming noise or undisciplined behaviour something which I am very much used to see in the city like Mumbai, as what we always see when other celebrities come to the public. All followers just bowed down with hands upwards to him and I did imitate them. I am really surprised by the management over there. Soon H.H started his lecture in Tibetan language and I found that there was a facility available of headphones to listen to the translation, but I preferred listening original speech by H.H. The Dalai Lama. I was already impressed by his voice, the dominant voice which has a unique quality to soothe the people. Unfortunately, I didn't get a chance to have a photograph with Dalai Lama but I was lucky enough to have his blessings on my head. This was ultimate and the unforgettable experience of my life which made my Dharamshala stay completely wonderful.

Monday, August 22, 2011

मसरूरचं रॉक टेम्पल

                                                  
तीर्थस्थानांना किंवा देवस्थानांना भेट देताना काहीवेळा बरेचसे साम्य जाणवते. एक म्हणजे मंदिरं हा या साम्यातला अविभाज्य भाग..वेगवेगळया ठिकाणी विविध पुरातन आणि भिन्न राजवटींचा इतिहास तसेच शिल्पशैलींचा शतकांचा वारसा सांगणारी मंदिरं, देवालय पाहायला मिळतात. हिमाचल प्रदेशात गेले असताना कांगरा जिल्ह्यात धरमशालाजवळ असणाऱ्या नारगोटा सुरीयन लिंक रोडवर अश्याच एका अतिपुरातन मंदिरशिल्पाला भेट देण्याचा योग आला. धरमशाला हे खरं तर तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असणारं छोटसं शहर आहे. मात्र खुद्द कांगरा जिल्ह्यातील इतर गावांमध्ये हिंदू संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. धरमशालेजवळ काठघर, बैजनाथ, बज्रेश्वरी,ज्वालामुखी आणि श्री नैनादेवी मंदिर अशी काही मंदिरं पाहायला मिळाली परंतु सर्वात उल्लेखनीय आणि लक्षणीय वाटलं ते मसरूरचं रॉक टेम्पल ! माझ्या गाईडला आधीच सांगून ठेवल्यामुळे त्यानंही सर्वच प्रेक्षणीय स्थळांना भोज्जा देऊन येण्याच्या कामगिरीला काट मारण्याची खबरदारी घेतली होती आणि त्यामुळेच मला हे मसरूरचं रॉक कट टेम्पल अर्थात एका अखंड दगडातून कोरलेलं अत्यंत सुंदर मंदिर शिल्प पाहण्याची संधी मिळाली.


धरमशालामधील भागसुपासून मसरूरला पोहोचायला आम्हाला सुमारे दोन तास लागले पण मसरूरजवळच्याच लुंज गावात मस्तपैकी दही-आलू पराठे असा नाश्ता झाल्यामुळे एवढ्या प्रवासाचं काही वाटलं नाही. खरं तर हे मंदिर दुर्लक्षित आहे हे तिथं पाउल टाकल्या टाकल्याच समजते. पुराणवस्तू संशोधन खात्यानं लावलेला ‘संरक्षित स्थळ’चा एक नाममात्र फलक तिथं आहे, त्यामुळेच केवळ या मंदिर प्राचीन असल्याचं समजते. बाकी तिथं कधीकधी प्रवेश फी घेण्यासाठी देखील द्वारपाल उपस्थित नसतो. ऑफ सिझन असो किंवा पीक सिझन असो, या मंदिरापाशी फिरकण्याची तसदी फारसे पर्यटक घेत नाहीत. मात्र ऑफबीट स्थळांना भेट देण्याची आवड असणारे काही पर्यटक आणि संशोधक-अभ्यासक इथे आवर्जून येतात. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हाही तिथं कोणीच पर्यटक नव्हते त्यामुळे ‘ देखो म्याडमजी, बोला था ना..यहां कोई भी नही है’ असं ऐकवण्याची संधी माझ्या गाईडला मिळाली.

जिथं प्रवेशद्वाराऐवजी मंदिराच्या मागून प्रवेश करावा लागतो असं मंदिर मी प्रथमच पाहत होते. मागल्या बाजूनं शिरतानाच या मंदिर शिल्पाची भव्यता जाणवते. आतमध्ये गेल्यावर पुढील प्रांगणात आल्यावर दोन मोठी शिखरं दिसतात. पूर्ण अवलोकन केल्यावर कळते कि हे संपूर्णपणे एकाच अखंड पाषाणातून कोरलेले भव्यतम असें १५ मंदिरांचे संकुल आहे. सुमारे १६० फूट लांब, १०५ फूट रुंद आणि ५०-६० फूट उंचीचे हे मंदिर शिल्प खरं तर भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कारच आहे. काही तज्ञांनी या मंदिराची कंबोडियातील ‘अंगोकार वट ’ या मंदिर शिल्पांशी तुलना केली आहे. मसरुरची हि सर्व मंदिरं पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामचंद्र, सितामाई आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. छोटेखानी दगडी सभामंडप देखील बांधलेला लक्षात येतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक नक्षीकाम आढळतं आणि तसेच नक्षीकाम मंदिरात ठिकठिकाणी दिसतं. पुराणवस्तू संशोधकांच्या आणि इतिहास तज्ञांच्या अंदाजानुसार हे मंदिरशिल्प आठव्या शतकात बांधलेलं आहे. अर्थात हे मंदिर कोणी आणि का बांधलं याचे काही पुरावे उपलब्ध नसले तरी या मंदिराशी निगडीत अनेक पौराणिक आख्यायिका परिसरात ऐकायला मिळतात. पांडवांनी हे मंदिर अवघ्या एका रात्रीत कोरून काढल्याची गोष्टही इथे सांगितली जाते. या मंदिराला ठाकुरद्वार आणि शिवमंदिर म्हणूनही ओळखले जाते .

मंदिरासमोरच्या आवारात अतिशय सुंदर असा दगडी बांध असलेला तलाव आहे. या बांधालगत काही शिल्पाकृती ठेवलेल्या दिसतात ज्यावर शिलालेखही आहेत. तलावाच्या पाण्यात मंदिराचं प्रतिबिंब फारच मोहक दिसतं विशेषतः पौर्णिमेच्या रात्री हा मंदिर परिसर अतिशय अलौकिक दिसत असल्याचं इथल्या पंडितजींनी सांगितलं. मंदिरातील राम-सीतेच्या मूर्तींची नैमित्तिक पूजा-अर्चना केली जाते. मला मात्र गाभाऱ्यात बराच अंधार असल्यामुळे मूर्तींचा फोटो काढता आला नाही. १९०५ साली झालेल्या प्रचंड भूकंपात या मंदिराची खूपच पडझड झाली. त्यावेळी तुटून पडलेले पाषाणखंड अजूनही तसेच आवारात आहेत. त्या भूकंपानंतर इथली काही शिल्प आणि मूर्ती सिमल्याच्या वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आली होती. प्रमुख मंदिराच्या जिन्यातून वर गेल्यावर धौलाधार पर्वतराजीने वेढलेला अतिशय मनोहारी परिसर पाहताना तिथून पाय निघत नाहीत.

पडझड झाल्यामुळे सध्या हे मंदिर शिल्प जीर्णशीर्ण झालेय. एका अखंड प्रस्तरात खोदलेले आणि तेही एकसंध असें हे मंदिर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्ण भारतात फक्त चारच ठिकाणी अशा प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात. मसरूर सोडल्यास आपल्या महाराष्ट्रातील कैलास वेरूळ लेणी, दक्षिणेला महाबलीपुरम येथील रथ आणि राजस्थानमध्ये धर्मनाथ इथं अशी अखंड पाषाणात कोरलेली मंदिर शिल्पकला आढळते. या मंदिरातली शिल्पकलेची शैली नागर पद्धतीची असली तरी शिखरांमध्ये दाक्षिणात्य द्रविडी शैलीचा प्रभाव जाणवतो. या शिल्पांमध्ये देव, अप्सरा, गंधर्व, शिव-पार्वती, ऋषी, प्राणी इत्यादींचा समावेश आहे. भारतीय शिल्पकलेच्या आणि पौराणिक इतिहासात मंदिरांचं स्थान अतिशय मोठं आणि अढळ आहे. मात्र मसरूरच्या या मंदिर शिल्पाचा ठेवा आजही दुर्लक्षित आहे. वास्तविक या मंदिराचा युनेस्कोतर्फे जाहीर झालेल्या जागतिक ठेव्याचा दर्जा असणाऱ्या स्थळांमध्ये समावेश झाला आहे परंतु त्या दर्जाची कोणतीही देखरेख किंवा सुरक्षा इथं आढळत नाही. एवढंच काय आजूबाजूला पर्यटकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा इथं आढळत नाहीत. प्रसारमाध्यमातून फारशी प्रसिद्धी मिळाली नसल्यामुळे या सुंदर मंदिराकडे जाण्याचे कष्ट पर्यटकही घेत नाहीत. पण हिमाचल प्रदेशात गेल्यावर आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि पौराणिक शिल्पकलेचा हा अनमोल नमुना नक्कीच पाहावा असा आहे.

Wednesday, August 10, 2011

when I met an archaeologist in the sky…

                                                      
It was the year of 2009 when I decided to visit Dharamshala as I was much impressed by the words of His Holiness Dalai Lama ( fortunately there I got an opportunity to attend his lecture & to see him from close ). I landed at Delhi airport from Mumbai to catch the flight to Dharamshala. I was not actually worried for how to spend whole two good hours at Delhi airport so started enjoying a good time at the bookshop and was just observing the people around while waiting for that dearest sugary boarding announcement for the flight to Dharamshala.
When I entered in the plane I was really amused by it's short and sweet structure as it was my first time to board on this kind of plane. I liked it at the very first sight. It was a flight for around 50-60 people and then soon I found myself adjusting to the last seat next to the door. While I was searching a good wide place to move my feet’s and a headrest, I heard someone speaking in ‘Shudhha Hindi Bhasha’ surprisingly ( as that flight had more foreign travelers than Indian ) I turned my head toward the scene and found one huge well heightened American ( he was dressed typically like a tourist with a felt hat ) was politely requesting to the flight attendant to place his big geographical map in the safe place. An American speaking the language of masses on a flight is not so regular scene, so I looked back because this gentleman conversing deliberately in Hindi was certainly an attraction for me. For a while, I forgot my seating penalty and enjoyed his conversation.
I was planning to request a shift of seat and I eyed upon empty seat near this American stranger. For a moment my journalistic curiosity aroused & I asked him if I can sit on that empty seat nearby his. He obliged me and then very soon we exchanged our visiting cards. I found him very friendly.  He informed me about the Dhauladhar range of mountains which we were watching through our plane windows and even helped me shooting them too.
After one & half hour our flight landed and I was smitten by the beauty around Kangra airport in Gaggal… It was strikingly awesome and then I heard the invitation sort of words from Mr. John Vincent Bellezza, my new & the first friend in Dharamsala.
We had a good simple Pahari style lunch at his home on my another day in Dharamshala and had very interesting time talking with him. John told me that he is living in India for 25 years and that’s the reason he can speak good Hindi (besides Hindi John can speak & understand 5-6 languages like Punjabi, Urdu, Western Pahari, Tibetan, Nepali, Spanish etc ) Still after 25 years in India a strong dedication exists in John which made him to took the decision to devote his life to the study of Tibetan civilization & now he is loving his life here in India so away from his home, from his people all the way. Salute to his adventurous life! Once again I met him when I was leaving Dharamshala ( again for a lunch  ) and promised John that I would not come back to him only for an official interview but would like to meet him again as a friend.
To know more about John Vincent Bellezza’s amazing genius personality please visit-  http://www.tibetarchaeology.com/

Tuesday, August 9, 2011

मनाचा वारू अफाट...जंगलात सुसाट

                                                             
एकदा का तुम्ही जंगलात पाऊल टाकलात कि जंगलाची नशा चढलीच समजा...जंगलं भासमय असतात..ती मोहात पडतात..वेड लावतात..तुमच्यावर जादुगिरी करतात..रूपं बदलतात..हे असं जंगल भटकंतीचं वेड लागलं ना कि मनुष्य नाद्खुळा होतोय बघा..मग तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा..जंगलाची साद तुम्हाला मनात ऐकू येते..त्या हिरव्यागार वाटभुली, ते कानोसे घेणं, चाहुलीवर पहारा ठेवणं, ती शोधाशोध आणि ते लपंडाव, थर्राट शिकारी आणि रात्रीच्या गप्पा..सर्वच अगदी कसे हवंहवंसं..तरी हि रान तिथे दूर...आणि इथे शहरात फक्त भास आणि श्वासच !

हा सोबतचा व्हिडिओ मी स्वतः एडिट केलाय..एडिटिंग मधली मजा आणखी काही वेगळीच असते..हे तर अगदी साधे एडिट आहे..पण जरूर पहा..मजा येईल..नक्की :)


Friday, July 1, 2011

बांधवगढ सफारी


                                          

आयुष्यात अद्वितीय म्हणजे काय हे नेमकं अनुभवलं बांधवगढच्या सफारीत( madhyapradesh-Bandhavgarh)...जंगलच्या राजाला इतक्या जवळून पाहायला मिळणं हे खरं तर भाग्यातच असावं लागतं, कारण कॉर्बेटला पाच सफारी करूनही मला वाघ काही दिसला नव्हता ( अर्थात कॉर्बेटचे जंगल इतकं अविस्मरणीय आहे की त्यापुढे मग मला निदान तेव्हा तरी वाघ नाही दिसला याचं दुःख झालं नव्हतं आणि मी स्वतः एकट्याने केलेली ती पहिली जंगल यात्रा होती तेव्हा त्याचंही थ्रील होतंच.) इथे पोस्ट करत असलेला लेख लिहिलंय माझ्या भावानं,म्हणजे शैलेंद्रनं पण ही ट्रिप दादा,वहिनी,मी आणि माझी भाची अपूर्वा,असे चौघे मिळून सॉलिड एन्जॉय केली होती. त्यावेळी पहिल्यांदा वाघ पाहिला, अगदी स्वतःच्या नजरेनं आणि मग पुन्हा पुन्हा त्याला पाहण्यासाठी जंगलात धाव घेतली. हा सोबतचा लेख वाचा आणि वाघाला पाहण्याचं थ्रील काय असतं ते समजून घ्या.

http://www.prahaar.in/collag/25052.html

This article on Tigers in Bandhavgarh,MadhyaPradesh,India was published in Prahaar on 30 May 2010.  

Tuesday, June 7, 2011

माझी कॉर्बेटकथा !

                                                          
'रुद्रप्रयागचा नरभक्षक', 'टेम्पल टायगर', 'कुमाऊंचे दिवस' अशी अनेक पुस्तकं, त्यातल्या जिम कॉर्बेट या धाडसी ब्रिटिश अधिकाऱ्यानं केलेल्या शिकारकथा आणि त्यातलं जंगलाचं वर्णन वाचून अंगावर काटा येत असे, पण या शिकारकथा नुसत्या वाचून काही समाधान होत नव्हतं. मग ठरवलं की जिम कॉर्बेटची ही कर्मभूमी म्हणजे आताच्या उत्तरांचलमधलं जिम कॉर्बेट नैशनल पार्क कसं आहे ते पाहायचेच.

जिम कॉर्बेट नैशनल पार्क रामनगर गावापासून सुरु होतं आणि याच गावात मोठ्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक उतरतात. जंगलात प्रवेश करण्याआधी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. राहण्याची सोय आणि ही परवानगी अशी दोन्ही कामं मी मुंबईतूनच करून ठेवली होती. भारतीय रेल्वेच्या कृपेनं दिल्लीहून संध्याकाळी पाचला सुटलेली माझी गाडी रात्री एकच्या सुमारास म्हणजे फक्त साडेतीन तास उशिरा पोहोचली. तिथे अश्या अपरात्री माझ्यासाठी ताटकळत राहिलेल्या जिप्सी ड्रायव्हरपासून ते रिसोर्ट व्यवस्थापकापर्यंत सर्वांचेच मग मी आभार मानले.
जंगल सफारी सकाळी सहापासूनच सुरु होतात. पार्क पहाटे पाच वाजताच खुलं आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होतं.ठिकठिकाणी चितळे, माकडं, काळवीट,सांबर, डुक्कर, मोर आणि अन्य विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाहायला मिळतात. नद्यांच्या काठावर मगरी आणि सुसरीही सुस्तावून पडलेल्या दिसतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी दिसणारी 'टर्माईट हिल्स' म्हणजे वारूळ.
जंगलात अजिबात प्रदूषण नसल्याची खात्रीच ही वारूळ देतात. या अभयारण्यात अजूनही काही गावं राहती आहेत ( आपल्या संजय गांधी नैशनल पार्कमध्ये काही कातकरी पाडे आहेत, तशीच ही गावं.) या गावांमध्ये वीजही नाही. पण इथल्या रहिवाशांना वर्षानुवर्षं राहिल्यामुळे जंगली श्वापदांचे फारसं भय वाटत नाही. १५ जून ते १५ नोव्हेंबर या काळात पार्क बंद असतं. गर्दीचा काळ हा साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे महिन्याचा. सध्या पार्कमध्ये १६४ वाघ आहेत. मात्र कॉर्बेटसारख्या सुमारे हजार चौरस मैलांच्या परिसरात विस्तारलेल्या या जंगलात जाऊन लगेच वाघ दिसेलच अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण हा जंगलचा राजा अतिशय लहरी आणि चतुर आहे. वाघ पाहण्याची खरोखर इच्छा असेल तर जास्त दिवसांचा मुक्काम हवाच. पण वाघ नजरेला पडलाच नाही म्हणून काही इथं येणारे वन्यप्रेमी निराश होऊच शकत नाहीत. रात्रीचं जंगल कसं दिसतं, काय बोलतं हे अनुभवायचं असेल तर इथल्या ढिकालाच्या जुन्या फोरेस्ट रेस्ट हाउसवर अवश्य मुक्काम करा, नव्हे कराच.
या जंगलामधल्या ढिकाला, बिजरानी, झिरनासारख्या विभागात फिरताना बऱ्याच ठिकाणी 'कॉल वेटिंग' वर थांबलेले पर्यटकांचे गट भेटतात. 'कॉल वेटिंग' म्हणजे शहरी माणसांची समजूत होईल की, फोनवरचं 'कॉल वेटिंग',पण जंगलाची डिक्शनरी वेगळी आहे, वाघ ज्या एरियात प्रवेश करतो, तेव्हा माकडं, सांबर खाकरून इशारा देतात, हरणं चौखूर उधळतात आणि पक्षीदेखील ओरडून संकेत देतात. या सर्व प्रकाराला अलर्ट कॉल म्हणतात आणि अश्या वेळी त्या एरियात जाऊन वाघाची वाट पाहत थांबणं म्हणजे 'कॉल वेटिंग. फक्त वाघ आणि वाघच पाहणार असं ठरवून आलेले पर्यटक, अशा ठिकाणी दुर्बिणीला डोळे लावून बसलेले असतात. इथं जंगलात फिरण्याचे परमिट लागतं. आतमध्ये फिरण्यासाठी बाराशे ते दोन हजार रुपये दरानं जिप्सी भाड्यानं मिळतात.
हे पार्क संपूर्ण पाहायचं तर कमीत कमी आठवडा हवाच.  संपूर्णपणे एकट्याने केलेली  ही माझी पहिलीच जंगल सफारी होती त्यामुळे ती अधिकच रोमांचक झाली.  हा सर्व वन्यप्रदेश अत्यंत सुंदर आणि विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त आहे.त्यामुळे मोकळा श्वास घेणं काय असतं हे अनुभवण्यासाठी इथं एकदा आलंच पाहिजे आणि हो..सोबत चांगला कॅमेरा मात्र हवाच.
कसे जाल कुठे राहाल
रामनगरमध्ये ६० हुन अधिक असे स्वस्त आणि महागडे देखील टूरिस्ट लॉज आणि रिसोर्ट आहेत. जवळ पंतनगरला विमानतळ आहे. हल्द्वानीलाही तो लवकरच होईल. दिल्ली- पंतनगर विमानप्रवास करून मग पुढं कोणत्याही वाहनानं रामनगरला ३-४ तासात पोहोचता येतं. दुसरा पर्याय म्हणजे दिल्ली-रामनगर उत्तराखंड संपर्क क्रांती एक्स्प्रेस पकडावी आणि थेट कॉर्बेट पार्क जंगलाच्या दारात उतरावं.
भेट सीताबनीची...
सीताबनीला उशीरच म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचले. वाटेतच एक नरभक्षक वाघ याच भागात फिरत असल्याचं पेट्रोलिंगसाठी निघालेल्या वन अधिकाऱ्यांकडून समजलं. सीताबनी हा कॉर्बेटच्या अगदी बाजूलाच लागून असलेला घनदाट असा बफर झोन आहे. उंचच उंच देवदार वृक्षांच्या जंगलामधून जाणारा नागमोडी वळणाचा रस्ता या प्रवासातले थ्रील वाढवत होतं. या वाघानं काही दिवसांपूर्वीच गावातल्या एका बाईवर हल्ला केला होतं. हा भाग बघायची तीव्र इच्छा आणि ड्रायव्हरनं दिलेल्या पाठींब्यामुळं मी शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात चांगलाच अंधार झाला आणि प्रत्येक गवताच्या पात्यामागे मला वाघ असल्याचा भास होत होतं. सोबतीला ड्रायव्हर गावात येणाऱ्या वाघांचे किस्से सांगत होता. हट्टाने घेतलेला निर्णय अंगाशी येतो की काय असे वाटू लागलं होतं..अंगावर काटा येत होता..उघडी जिप्सी आणि त्यात मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण..पर्यटक म्हणून वाघ मला सूट देईल असे काहीच नव्हतं. वाटेत परतणारा एक गट भेटला, त्यानाही वाघाची चाहूल लागली होती म्हणूनच ते ही वेगानं गावाकडे परतत होते. मग शेवटच्या गेटपर्यंत जाण्याचा निर्णय रद्द करून मी देखील ड्रायव्हरला जिप्सी परत वळवायला सांगितली.
कॉर्बेटच्या प्रवासात वाघ नाहीतरी हत्तीच्या पाठलागाला पाठ( !) देताना जीव कसा गोळा होतो, हे मात्र मला कळलेच. हत्तीच्या शोधात आम्ही जिप्सी दाट गवतात घातली. काही अंतर जाताच एक तस्कर( सुळेवाला हत्ती ) त्या गवतामधून उगवला आणि जोरानं चीत्कारून त्यानं आम्ही आल्याचं अजिबात आवडलं नसल्याचं सांगून टाकलं. गाईड ऐकायला तयार नव्हता. त्याला हत्तीच्या अधिक जवळ जायचं होतं. जीप थोडी पुढं सरकताच त्या हत्तीनं दाणदाण पाय आपटून जीपच्या दिशेनं मोर्चा वळवला. मग आमच्या ड्रायव्हरनं कशीबशी जिप्सी मागं वळवली आणि आम्ही तिथून सुंबाल्या केला !
P:S २०११ च्या व्याघ्रगणनेत कॉर्बेट पार्क मध्ये २९५ वाघ असल्याचं समजतं. लेखात नमूद केलेली संख्या ही २००८ सालची आहे.

Note:- This article was earlier published in Marathi news daily 'Prahaar' on 17th January 2009.Link is not available in archives.

Sunday, May 1, 2011

जंगलच्या राजाची 'राजधानी'

                                                  
लांबलचक आणि अफाट पसरलेला अथांग इराई डोह थेट मोहर्लीपर्यंत सोबत करतो. जंगलाकडे जाणाऱ्या वाटेची दिशा दाखवली की जणू तो निश्चिंत होतो. विदर्भातल्या उन्हाळ्याला आता मनानं केव्हाच मागे टाकलेलं असतं आणि इराई डोहामुळे भुललेले मन आता पुढल्या रानभुलीसाठी तय्यार झालेले असतं. जंगलात बसलेला तारू देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि मनासारखे प्राणी दिसावेत हि तुमची प्रार्थना एव्हाना त्याच्यापर्यंत पोचलेली असते. पहिल्याच टप्प्यात तेलिया डोहावर मगर दाखवण्यासाठी म्हणून गाडी विसाव्याला उभी राहते आणि उन्हामध्ये तेलिया डोहाच्या चमचमत्या पाण्याकडे पाहता पाहता कधीतरी तंद्री लागते आणि क्वचित मृगजळासारखे भासही होतात. डोहाच्या पलिकडल्या मातकट हिरवळीवर वाघ चालतोय असाही भास होऊ लागतो आणि बरेचदा हा भास खरादेखील ठरतो. तेलियाच्या रस्त्यावर आधी लागणाऱ्या चिचघाटातून जातानाही बाजूच्या काटेरी जाळीतून कोणीतरी आपल्याला समांतर चालत आपल्यावर नजर ठेवून असल्याचे जाणवते आणि अकस्मात त्या माणिक डोळ्यांचा मालक, बिबट्यावाघ तुमच्यासमोरच झेप घेऊन रस्ता क्रॉस करतो.
थोडी जिप्सी पुढं न्यावी तर (स्लोथ बेअर) काळीभोर केसाळ अस्वल मादी मोहाची फुले हुंगत हुंगत येताना दिसते. तुम्हाला पाहिल्यामुळे झाडावर चढण्याचा बेत तिने वरकरणी तरी रद्द केलेला असतो. पुढल्या वळणावरल्या टाक्यावर भेकराची मादी तहानेने इतकी व्याकूळ झालेली असते की जिप्सी पुढ्यात येऊन थांबली तरी ती दुर्लक्ष करते आणि चटचट पाणी पीत राहते.
इतक्या साऱ्या जंगलजादूनंतर एव्हाना ताडोबाच्या रानाची झिंग चढायला लागलेली असते आणि त्यात गाईड मोहाची फुले आणि टेंभूर्लीची फळं चाखायला देऊन अजून भर टाकतो. हे इतक्यावरच थांबत नाही कारण ताडोबाच्या जंगलानं खरे पत्ते अजून उघडलेलेच नसतात. या अरण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अरण्य पर्यटन आणि फोटोग्राफीच्या दृष्टीने अजूनही 'रॉ' आहे. काही भागामध्ये वनखात्याच्या माणसांखेरीज दुसरं कोणी फारसं गेलेलंही नाही. त्यामुळेच इथल्या भ्रमंतीची मजा काही वेगळीच आहे. ६२५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हक्क सांगण्याऱ्या या ताडोबाच्या भूलभूल्लैय्या जंगलात आम्हीदेखील तारू देवाची प्रार्थना करीत जिप्सीनं उभे-आडवे रस्ते धुंडाळत होतो.
यंदाचं वर्ष हे अंतरराष्ट्रीय वन वर्ष आहे हे माहित पडल्यापासूनच यावर्षीच्या भटकंतीचा शुभारंभ एखाद्या व्याघ्र प्रकल्पापासून करावा असा विचार डोक्यात होताच. त्यातच पुण्याच्या तरुणाईला जंगल भ्रमंतीची चटक लावण्याचा ध्यास घेतलेल्या रोहन तावरेच्या ‘ जिप्सीज आउटडोअर’ ग्रूपबरोबर सामील होण्याचे आमंत्रण मिळालंच होतं, मग म्हटलं महाराष्ट्रातलं हे वैभव पाहण्याची संधी का सोडा..आमच्यापैकी काहीजण अगदी पहिल्यांदाच जंगलात फिरण्याचा अनुभव घेत होते तर काहीजण अगणित वेळा जंगल वारी करून आलेले 'वारकरी' होते. नुकतीच व्याघ्र गणनेची आकडेवारी हातात पडली होती. वनांचं क्षेत्रफळ कमी झालेलं असलं तरी वाघांची संख्या वाढलेली असल्यामुळे राज्यातल्या या दुसऱ्या मोठ्या व्याघ्र प्रकल्पात जाताना हुरूप आला होता. सध्याच्या गणनेनुसार ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 60 च्या वर गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. खातोडा गेटवरून एकावेळी २७-२८ गाड्या आत सोडल्या जातात. ताडोबा-मोहर्ली रेंजजवळच्या परिसरात अजून तरी कॉर्बेट किंवा बांधवगढप्रमाणे व्यावसायिक रिसोर्टनी आक्रमण केलेलं नाही. त्यामुळे M.T.D.C च्या विश्रामगृहावरच पर्यटक बरेचसे अवलंबून आहेत. ताडोबा- अंधारी टायगर रिझर्व देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जो पावसाळ्यातही पर्यटकांसाठी अंशतः खुला असतो मात्र पावसामुळे काही रस्ते बंद ठेवण्यात येतात . ताडोबाला जाणार असाल तर M.T.D.C चं विश्रामगृह उत्तम पर्याय आहे. मोहर्ली गेटच्या अगदी जवळ राहण्याचे हेच ठिकाण आहे जे रिझनेबलदेखील आहे. इंटरनेटवर पर्यटनविषयक माहिती देण्याऱ्या काही प्रसिद्ध संकेतस्थळांवर या अतिथीगृहाविषयी खराब रिव्ह्यूज लिहून पर्यटकांची दिशाभूल करण्यात आली आहे , पण ते खरे न मानता प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा असा सल्ला आहे. पांढरपवनी, तेलिया,येनबुडी, काटेझरी, वसंतबंधारा अशा काही भागांखेरीज या अभयारण्यातले आणखी काही रस्ते पर्यटकांसाठी खुले करावेत अशी मागणी इथल्या गाईडसनी केलीयं. पण अरण्याचा खूपसा भाग अजून 'माणसाळलेला' नाही आणि हेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं मोठं आकर्षण आहे. पर्यटकांचा त्रास त्यामानाने कमी आणि वन्यप्राणी दिसण्याच्या मुबलक शक्यतांमुळे national geographic सारख्या वाहिन्यांच्या टिम्स इथे शूटिंगसाठी तळ टाकून बसलेल्या दिसतात.
प्राणी हमखास दिसतील अशी अपेक्षा न बाळगता गेलात तर ताडोबा अभयारण्यासारखा दुसरा खजिना राज्यात नाही. अपवाद फक्त सह्याद्रीचं जंगल आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा.
इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर, जिप्सीच्या आवाजानं सावध होऊन कान टवकारत, उड्या मारत चौखूर उधळणारे, इतरांना सावध करणारे, प्रवासी आल्याबद्दल नापसंती दर्शवणारे, जाळीतून दबक्या पावलांनी आतल्या जंगलात नाहीसे होणारे , गवताळ कुरणाच्या रंगात मिसळून लपणारे, डोहाच्या पाण्यातून नजर रोखणारे असे शेकडो पशु-प्राणी भेटतात . ताडोबाचं हे जंगलबुक खरेच अदभूत आहे. अर्थात या सर्वाना पाहण्यासाठी धीर आणि संयम हवाच.
आम्ही असाच पेशंस ठेऊन राहिलो आणि काटेझरीत एका भल्याथोरल्या नर वाघानं आम्हांला मनसोक्त दर्शन दिलं. काटेझरीत वाघ बसल्याची बातमी सकाळीच लागली होती आणि मग वाघ पाहण्यासाठी उत्सुक अश्या साऱ्यांनीच तिकडे जिप्सी वळवल्या. समोर २०-२५ गाड्या असताना हा वाघ आरामात जाळीत लोळण घेत दुपारची वामकुक्षी घेत होता. शेवटी त्याच्या विश्रांतीत फारसा व्यत्यय न आणता त्याला रामराम करावा लागला. पण त्याचवेळी तेलिया डोहावर वेगळेच नाट्य घडले होते. डोहालगतच्या हिरवळीवर बसून वाघ-वाघिणीच्या जोडीनं मनमुराद टाईमपास केला होता आणि तिथे असणाऱ्या एका पर्यटक जोडप्यासाठी हा लग्गा ठरला होता. या जोडीचं फोटोसेशन करताना त्यांनी क्यामेराची मेमरीकार्ड्स अक्षरशः रिती केली होती..
पण जंगलात असेचं चालतं . धावत्या जिप्सीतून नजरेला अनेक आकार दिसत असतात. जाळीमागे कोणीतरी नक्कीच दडलंय असे भास होत राहतात. कधी झाडामागून कोणीतरी पळालं असं वाटून जातं. हिरव्या गर्द झाडांमधून तऱ्हेतऱ्हेचे आकार उगाचच दिसत असतात. आमच्यासमोर हिरव्या-पिवळ्या जाळीमधून बिबट्या अवतरला तो क्षणही असाच भासमयी होता. पण त्याची ऐटबाज सावध टप्प्याटप्प्याची चाल पाहून आम्ही भानावर आलो. दिवसा फारसा दृष्टीला न पडणारा बिबट्या दिसला आणि त्यावेळी वाघ दिसण्यापेक्षाही जास्त आनंद झाला. ताडोबाच्या सफरीत तीन वाघ पाहून झाले असल्यामुळे बिबट्या हा सर्वस्वी अनपेक्षित बोनस होता. मात्र बिबट्या दिसल्याचा आनंद आम्ही ताडोबाहून परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या एका बातमीनं हिरावून घेतला. अष्टभुजा गावाजवळ बिबट्याच्या एका तहानलेल्या ६ महिन्याच्या बच्च्याला गावकऱ्यांनी अमानुष रीतीनं मारलं. पण या परिसरात अश्या घटना नव्या नाहीत असं आमच्याबरोबर असलेल्या आणि ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’मध्ये फील्ड ऑफिसर असणाऱ्या आदित्य जोशीनं सांगितलं. त्याच्या मते अश्या प्राण्यांना पकडून त्यांना सुखरूप त्यांच्या निवासात सोडण्यासाठी वनरक्षकासोबत प्रशिक्षित लोकांचीही गरज आहे. अश्या प्रशिक्षित लोकांची rapid response team, अत्याधुनिक उपकरणं असलेलं मोबाईल व्हेट वाहन घेऊन कोणत्याही गावात जाऊ शकेल आणि त्यामुळे अश्या दुर्दैवी घटना टळतील.
गेल्याच वर्षी ताडोबामध्ये काही सिमेंटची पाणटाकी बांधण्यात आली होती. बांधताना रस्त्याजवळ बांधल्यास त्यामध्ये tanker नं पाणी भरणं सोपं जाईल या विचारानं ही टाकी रस्त्यालगत बांधण्यात आली होती. पण एकदम रस्त्याला लागून असल्यामुळे प्राणी तिथे यायला बिचकतात आणि तहानलेलेच राहतात. त्यामुळेच कधी कधी शिकारी प्राणी त्यांच्या तहानलेल्या सावजापाठोपाठ गावात शिरतात किंवा स्वतःदेखील पाण्यासाठी गावाच्या आसपास येतात. अश्या वेळी प्राण्यांचा हकनाक बळी जाण्याचा मोठा संभव असतो. असे प्रसंग घडतात हे लक्षात आल्यामुळेच ही पाणटाकी थोडी आतल्या बाजूला बांधण्याचे काम सुरु आहे. ताडोबाच्या क्षेत्रात इराई, ताडोबा, तेलिया, खातोडा असे एकूण २४ छोटे-मोठे तलाव आणि पाणझरे आहेत. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण होते आणि प्राण्यांची अगतिकता उघडी पडते.
देशातल्या एकूण ३९ टायगर रिझर्वपैकी ताडोबा-अंधारी हा महाराष्ट्रातला एक व्याघ्र प्रकल्प. ताडोबामध्येही यंदा वाघांची संख्या वाढलीये. महाराष्ट्रानं 'टायगर कॅपिटल'चा किताब यंदा मध्यप्रदेशकडून हिरावून घेतलाय. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नागपूरला 'टायगर कॅपिटल' म्हणून विकसित करण्याचं आश्वासन दिलंय. इथं आसपास ६० हून अधिक गावं आहेत. लोकसंख्या वाढतेय आणि जंगलाचं क्षेत्रफळ कमी होतंय. इथले टायगर कॉरीडोर अवैध कोळसा खाणींमुळे आधीच धोक्यात आलेत. पण या सर्वावर मात करून ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वच्या वाट्याला अधिक सुधारणा येतील अशी आशा आहे.
ताडोबा-अंधारी टायगर रिझर्वमध्ये आज वाघांची संख्या 69 च्या आसपास आहे , ज्यात २५-२८ बछडे आहेत. पण वाघाखेरीज इथं बर्डींगही अप्रतिम होते. पक्षीप्रेमींसाठी तर ताडोबा अभयारण्य म्हणजे तीर्थस्थानच आहे. .चेन्जेबल हॉक-इगल , क्रेस्टेड सर्पंट इगल, इंडियन रोलर (नीलकंठ) , इंडियन पिटा, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर, ग्रीन पिजन, इंडियन ग्रे होर्नबील, जंगल फाउल असे नानाविध पक्षी आढळतात. किंगफिशर, river lapwing, white heron, serpent eagle, rocket tailed drango,flame backed woodpecker, white shouldered kite, green pegion अश्या कित्येक मनमोहक रंगांच्या पक्ष्यांची इथं मांदियाळी आहे. त्याशिवाय मगर, गवे, हरणं, नीलगाय, सांबर, रानटी कुत्रे, साळींदर, चंदेरी पाठीचे अस्वल अश्या प्राण्यांचेही हे आश्रयस्थान आहे. डिकेमाली, बेहडा, हिरडा, बेलफळ, अर्जुन अश्या अनेक वनौषधी या रानात आहेत. नुसतं अरण्यात जरी भटकायचं म्हटलं तरी आठवडा पुरा होणार नाही. अश्याच मोठ्या भटकंतीनंतर आपोआपच इथल्या टेंभूर्लीच्या झाडाकडे जाणाऱ्या वाटा तुम्हाला पाठ होतील आणि डोक्यावरून उडालेला पक्षी नीलकंठ होता की सोनेरी पाठीचा सुतार हे ओळखण्यासाठी तुम्हाला गाईडची गरज भासणार नाही. ताडोबाच्या जंगलाचा तारू देव तुम्हाला प्रसन्न झालेला असेल !

Link for published article :  http://www.prahaar.in/collag/40898.html

Saturday, April 30, 2011

कुर्ग- निसर्गाचे शांतीवन


                                                                                                                     
नजर पोहोचत होती तिथपर्यंत कंच, लुसलुशीत शेती पसरलेली.. जोडीला नारळीच्या बागा.. मधूनच डोकावणारी टुमदार कौलारू घरं आणि या सर्वावर कडी करणारी टेकडय़ांच्या मागून सूर्यास्ताची अप्रतिम रंगउधळण..पण हे सर्व फक्त नजरेतच साठवण्याची बंदी आमच्यावर आली होती. कारण धड कुठलीच फ्रेम कॅमेरा तर सोडाच पण साध्या डोळ्यांतही पकडता येत नव्हती. एखाद्या स्पर्धेत भाग घेतल्यासारखा आमचा बस ड्रायव्हर तुफान वेगात बस हाणत होता. बंगळूरुपासून निघालेले आम्ही कुर्गपर्यंत वनपीस पोहोचू की नाही, या चिंतेत होतो. आमच्या सहप्रवाशांची मात्र या वेगाबाबत काहीच तक्रार नव्हती, कारण समोरच्या स्क्रीनवर कन्नड हिरो पुनीत राजकुमारचा सुपरहिट पिक्चर ‘आरासू’ सुरू होता.
वळणावळणाच्या घाटरस्त्यावरून चढून अखेर बस मडीकेरीत दाखल झाली आणि लहरी पावसानं आमचं स्वागत केलं. आधीच घाटमाथ्यावर असल्यानं थंडीचा गारवा जाणवत होताच, त्यातच पावसात भिजल्यामुळे अंगावरच्या शिरशिरीचं रूपांतर हुडहुडीत झालं होतं. पण तितक्यातच छत्री घेऊन आलेल्या आमच्या होम स्टेचे यजमान संगप्पा यांनी स्वागत केलं आणि आमची पावसापासून सुटका झाली. त्यांच्या घरी जाऊन मस्तपैकी गरमागरम घरगुती कर्नाटकी पद्धतीच्या जेवणावर ताव मारला. शांतीअम्मांच्या त्या जेवणामुळेच खरं तर इतर रिसोर्ट किंवा हॉटेल्सपेक्षा ‘होम स्टे’चं वेगळेपण जाणवलं. अतिथी म्हणून राहण्यापेक्षा घरातलेच समजून रहा, असा संगप्पांचा आग्रह होता. हे आम्हाला नवीनच होतं. कारण कुर्गमध्ये होम स्टेचा घरगुती उद्योग आता अत्यंत कमíशअलाइझ झालाय. जवळपास 80 टक्के घरांवर, बंगल्यांवर ‘होम स्टे अव्हेलेबल’च्या पाटय़ा दिसतात. अखेर पैशांचाच व्यवहार असल्याकारणानं घरगुती आदरातिथ्याची कितीही जाहिरात केलेली असली तरीही हा घरगुती ‘प्रेमळपणा’ किती मर्यादेत असेल, याची शंका राहतेच.
भरपूर वेळ असल्यानं उगाचच घाईगर्दीत रपेट आम्हाला करायची नव्हती आणि कुर्गचा एकूण परिसरदेखील तसा निवांतच दिसत होता. हिल स्टेशन असलं तरीही कर्नाटकातला हा छोटासा तालुका अद्याप पारंपरिक वळणाचा आहे. उत्तरेतल्या हिल स्टेशनांवर आढळणारा बाजारूपणा कुर्गमध्ये अद्याप बोकाळलेला नाही. कुर्ग हे नाव वास्तविक बाहेरच्या पर्यटकांसाठी, इथं मात्र कोडगु हेच नाव प्रचलित आहे.
कोडगु हा पूर्वीचा जिल्हाच पण आता मडिकेरी, विराजपेट आणि सोमवारपेट यांचा मिळून झालेला तालुका. मध्यवर्ती असणारं मडिकेरी तसं लहानच आहे. त्यामुळे दोन-चार दिवसातच तिथले रस्ते, गल्ल्या, हॉटेलं, बाजारपेठ हे सारं अंगवळणी पडलं. पण आम्ही शॉिपंगचा मोह टाळून फिरस्त्याच्या भूमिकेत शिरायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही कुशालनगरकडे मोर्चा वळवला. गेली 45 वर्षं तिथं स्थायिक झालेल्या तिबेटी लोकांच्या वसाहतीत जाण्याचं कुतूहल मनात होतं. कुशालनगरपासून आठ किलोमीटर अंतरावर बयालाकुप्पे इथं तिबेटी लोकांची वसाहत आहे. 18 हजारांहून अधिक तिबेटियन्स इथं राहतात. एका परीनं मिनी तिबेटच आहे हे. इथल्या गोल्डन मोनॅस्ट्रीमध्ये भली मोठी बुद्धाची मूर्ती आहे. त्यांचा मोठाल्या झांजा घेऊन चालणारा एक नृत्यप्रकार पाहायला आम्ही तिबेटी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसलो; त्यामुळे तिबेटी चहाचा प्रसादही मिळाला. पण तासभर होऊन गेला तरीही ते संथगतीनं चाललेलं नृत्य काही संपण्याची चिन्हं दिसेनात. मग आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचं प्रेम आवरतं घेतलं आणि आम्ही दुबारे एलिफंट कॅम्पचा रस्ता धरला.
हत्तींच्या निवासाच्या या ठिकाणी कावेरी पार करून जावं लागतं. थोडासा उशीर झाल्यामुळे खुद्द गजराजांना आंघोळ घालण्याची संधी हुकली. मात्र या पाळलेल्या हत्तींना बघण्यापेक्षा कावेरी नदीच्या काठी असलेल्या मस्त हिरव्या पठारावर आराम करायला सर्वच धावले.
मडीकेरीपासून तासाभराच्या अंतरावर तळकावेरी आणि भागमंडळ आहे. भागमंडळमध्ये कावेरी, कणिके आणि सुज्योती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तर तिथूनच वरल्या बाजूला असणा-या तळकावेरीला एक छोटय़ाशा कुंडामध्ये झ-याच्या स्वरूपात कावेरी नदीचा उगम पहायला मिळतो. पण इथं न चुकवण्यासारखा आहे तो ब्रह्मगिरीचा छोटासा ट्रेक. तळकावेरीच्या मंदिरावरून अजून एक अर्ध्या तासाचा चढ म्हणजे काहीच नाही आणि धुक्याच्या ढगांमध्ये हरवून जायचा अनुभव घ्यायचा असेल तर ब्रह्मगिरीवर जायलाच हवं.
मडीकेरीमध्ये 1814 साली हलेरी राजांच्या काळात बांधलेल्या किल्ल्यात आणि राजवाडय़ात सरकारी ऑफिसेस आहेत. युरोपिअन वास्तुशैलीतल्या या राजवाडय़ाच्या एका भागात पुरातन वस्तूंचं संग्रहालय आहे. मडीकेरीनं अशा अनेक जुन्या खुणा अंगावर अजूनही बाळगल्या आहेत. राजाज सीट त्यापैकीच एक जागा. कधीकाळी कोडगु प्रांताचे राजे इथं दरीच्या काठावर बसून सूर्यास्ताचे क्षण पाहत. आता राजे नसले तरीही समोर हिरवाईनं गच्च दरी तशीच आहे आणि त्यापलीकडे अस्ताला जाणा-या त्या भास्करालाही आपल्या स्टेटसमुळे काहीच फरक पडत नाही, त्यामुळे हा विलोभनीय देखावा (फक्त पाच रुपयांत!) निवांतपणे अनुभवता येतो.
मडीकेरीहून साधारण दोन-अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही अभयारण्यात पोहोचलो. इथं हत्ती मात्र मुबलक प्रमाणात आहेत. नागरहोलेचे हे घनदाट जंगल वाचत जाताना अजगर, मुंगुस, रानडुक्कर, गरुड, घुबड, सांबरांचे कळप, रानकुत्र्यांची टोळी आदींनी दर्शन देऊन आमचा हा लहानसा जंगल वाचनाचा धडा पूर्ण केला.
my article previously published in: -http://www.prahaar.in/collag/39643.html

शुभ्रसुंदर धरमशाला

                                               
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अध्र्या-एक तसात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत-फिरत पंधरा-वीस दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. ‘किंगफिशर’चं छोटेखानी विमान अवघ्या दीड तासातच दिल्लीच्या शाहरी गजबजाटापासून आपल्याला एका वेगळ्या जगात आणून सोडतं.. समोर याला लँडस्केप म्हणावं की एअरपोर्ट, अशा कोड्यात टाकणारा अप्रतिम कांगरा एअरपोर्ट असतो. धरमशालाला विमानमार्गे जायचं असेल तर इथंच यावं लागतं. उतरल्या-उतरल्या प्रेमातच पडावा असा हा सुंदर-सुबकसा आणि छोटासाच कांगरा विमानतळ कांगरा हॅलिमधल्या गग्गल गावात आहे. धरमशाला इथून साधारण 40 ते 45 मिनिटांवर आहे. (बाय रोड) या एअरपोर्टवर दिवसातून फक्त एकदाच विमान उतरतं आणि तेच विमान परतीच्या प्रवाशांना माघारी दिल्लीला घेऊन जातं. छानपैकी विविध फुलांची बागा मेटेंन केलेला आणि सभोवताली ‘धवलधार’ पर्वत रांगानी वेढलेला हा कांगरा एअरपोर्ट पुढल्या प्रवासात दिसणा-या निसर्गसौंदर्याची चुणूक दाखवतो.

कांगरा हा हिमाचल प्रदेशातला सर्वात मोठा जिल्हा. धरमाशालामध्ये पोहोचेपर्यंत रस्त्यावरल्या गावांमध्ये ‘प्रकृती की रक्षा, जलसंपदा बचाओ’, ‘सर्वशिक्षा अभियान’ अशा टाइपच्या सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचल्याच्या खुणा दिसत राहतात. वाटेतल्या गावात उतरून पहाडी कावा पिणं मस्ट असतं. नाही तर तिथल्या जोरदार थंडीमध्ये तोंडाची बडबड सुरू ठेवणं मुश्कील होतं.
उत्तरेकडची सर्व हिल स्टेशन्स पालथी घातलीयत, त्यात आता आणखी धरमशालात काय उरलंय पाहण्यासारखं, असं म्हणणारे पर्यटक खरोखरीच मनात आणलं तर अर्ध्या-एक तासात पूर्ण धरमशाला पाहून टाकू शकतात, पण खरं तर असा विचार करणं चुकीचंही ठरू शकतं. इथं तब्येतीत मस्तपैकी ट्रेक करत करत आणि गेस्ट हाऊसेसच्या रूमवर लोळत, इथल्या मार्केटमध्ये फिरत फिरत 15-20 दिवस काढल्याखेरीज धरमशालाचं कल्चर आपल्याला कळत नाही. म्हटलं तर धमशाला आणि भागसूनाग, मॅकलिऑड गंज, फोरसिथ गंज, नड्डी, तलनू, धरमकोट असा सर्व आपसपाचा एरिया अगदी टिकलीएवढा आहे; पण धरमशाला म्हणजे केवळ फॉरेनर्सची चहल-पहल नाही, तर तिबेटियन कल्चरचा झेंडा हिज होलीनेस दलाई लामांच्या या आवडत्या निसर्गधामात पक्का रोवला गेलाय. या ‘लिटिल ल्हासा’त तिबेटियन संस्कृतीचा आणि दलाई लामांचा प्रभाव पावलोपावली जाणवत राहतो.
शेवटी नाही म्हटलं तरी धरमशालाकडून येणारा पर्यटन महसूल हा बहुतांशी दलाई लामांमुळेच इथं भेट देणा-या विदेशी पर्यटकांच्या खिशातून येत असतो. हिज होलीनेस दलाई लामांच्या टिचिंग सेशन म्हणजे प्रवचनांसाठी धरमशालात पर्यटक आणि त्यांचे शिष्य जगभरातून येत असतात. नुसतेच येत नाहीत तर हजारो जण इथंच तीन ते सहा महिने मुक्काम ठोकून असतात. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा धरमशालेत वर्षातून दोन ते तीन वेळाच टिचिंग सेशन घेतात. अनेकदा ही टिचिंग सेशन्स त्यांच्या रशियन, अमेरिकन, जर्मन शिष्यांसाठी असतात. तरीही प्रत्येक वेळी केवळ हिज होलीनेसना पाहण्यासाठी म्हणून श्रद्धाळू तिबेटियन्स हजारोंच्या संख्येनं त्यांच्या मठात गर्दी करतात.
मार्केटमध्ये फिरतानाही अमिताभ बच्चनच्या खर्जातल्या आवाजाशी स्पर्धा करणा-या दलाई लामांच्या आवाजातल्या प्रवचनांच्या सीडीज- टेप्स जागोजागी दुकानातून ऐकू येतात. तिबेटी भाषेचा आपल्याला गंधही नसला तरी एकूणच या धीरगंभीर आवाजात प्रेमळ हुकूमत आणि आश्वासकता जाणवते. ‘सेव्ह तिबेट’च्या आंदोलनाला चीनमध्ये स्थान नसलं तरी धरमशालामध्ये मात्र या चळवळीचं अस्तित्व ठिकठिकाणी दिसतं. इथल्या तरुण पिढीचे पालक गेल्या जमान्यातल्या तिबेटमधून निर्वासित म्हणून धरमशालेत येऊन राहिलेले आहेत. तसाच तरुण मुलांच्याही मनात भारत आणि तिबेट असा भेदभाव पक्का आहे. ‘सेव्ह तिबेट’च्या या चळवळीत तरुण मुलं बहुसंख्येनं आहेत आणि विशेष म्हणजे आपण कधी ना कधी स्वतंत्र तिबेटमध्ये परत जाणार, ही भावना ही मुलं पटकन बोलूनही दाखवतात. गॉड ब्लेस देम ऑल!
बौद्धमठ किंवा मोनॅस्टरीज् हे धरमशालाचं उल्लेखनीय वैशिष्टय़. अर्थातच हिज हायनेस दलाई लामांच्या अस्तित्वामुळे धरमशाला आणि परिसरात अनेक बौद्धमठ आढतील; पण या सर्वामध्ये सर्वात देखणी मोनॅस्टरी आहे ती कर्मापा मोनॅस्टरी. सिधबारीजवळ असणा-या या भव्य बौद्धमठात तितकीच प्रसन्न शांतता आहे. या मठात दलाई लामांच्या खालोखाल आदरणीय मानले जाणारे सतरावे कर्मापा राहतात. ओग्येन ट्रिनले दार्जी कर्मापा अवघ्या 24 वर्षाचे आहेत. कर्मापा आणि दलाई लामा हे दोघंही पुनर्जन्म घेतात, असं मानलं जातं. बौद्धमठांखेरीज इथल्या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’मध्येही फेरफटका मारायलाच हवा. या मठाची रचना एका जपानी वास्तुरचनाकारानं केली आहे. काळय़ा दगडांचा वापर करून बांधलेल्या या मठावर आणि तिथल्या बागेवर अर्थातच जपानी वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. इथं आर्टिस्ट मुलं येऊन राहतात आणि शिल्पकाम, चित्रकला, सुतारकाम, शिवणकाम, गार्डनिंग, हस्तकलेसारख्या कला शिकतात. त्यांना इथं ‘थांगका आर्ट’ ही तिबेटियन धार्मिक चित्रकला शिकवली जाते. यात चित्रं रंगवताना सोन्याचा वापर होतो आणि त्यांचे रंगही विशिष्ट प्रकारे बनवले जातात. त्यामुळं ही चित्रं शेकडो वर्ष टिकतात आणि तिबेटियन संस्कृतीत या ‘थांगका’ चित्रांना खास महत्त्व आहे.
या ‘नॉरबुलिंका इन्स्टिटय़ूट’नंतर अनेक गाईड फोरसियगंजला जाऊन स्तराव्या शतकातलं एक चर्च पाहण्याचा आग्रह करतात. तिथे विशेष काही पाहण्यासारखं नाही; पण बाजूच्याच सिमेट्रीत देवआनंदची एकेकाळची हिरॉईन आणि जिची मुंबईतल्या तिच्या राहत्या घरी हत्या झाली, ती प्रिया राजवंश इथं चिरविश्रांती घेताना पाहून नवल वाटतं.
जिभेला बारा गावांच्या खाण्या-पिण्याची चटक असेल तर धमशालेत नुकतेच तिबेटी आणि भारतीय नाही तर देशादेशींच्या खाद्यपदार्थाचे ऑप्शन्स मिळतात. प्रत्यक्षात ज्या देशांचं एकमेकांशी पटतही नाही, अशा अमेरिका, जर्मनी, इस्रायल, हंगेरी, रशियन, जपान, इटलीसारख्या देशांची खाद्यसंस्कृती इथं सुखनैव एकत्र नांदताना दिसते. साठ-सत्तर रुपयांत दोन दिवस पुरेल इतकी कॉफी देणारी इथे अनेक ‘कॅफेज्’ आहेत. त्यामुळे तीन-चार तास एका ठिकाणी गप्पा मारण्यासाठी एकत्र येणा-या पर्यटकांची मोठीच सोय होते. रिझनेबल दरातलं, उत्तम आणि चविष्ट तिबेटियन फूड खायचं असेल तर ग्यामेड मोनॅस्टरी हे बेस्ट ठिकाण नाही तर मग कोणत्याही स्ट्रीट फूड जॉइंटचा रस्ता धरणं उत्तम. आपल्याकडे जेवढी वडापावाला लोकप्रियता आहे तेवढाच फेमस इथला ‘थुगपा’ आहे. थुगपा म्हणजे भाज्या घालून शिजवलेल्या रस्सेदार नूडल्स. गरीब-श्रीमंत असे सर्वजण दिवसातल्या कोणत्याही वेळी या थुगपावर ताव मारताना दिसतात.
धरमशाला मनसोक्त भटकून झाल्यावर इथं ट्रेकिंगसाठीदेखील त्रियुंड तोरल पास, ब्लेनी पाससारखे अनेक पर्याय आहेत. हे ट्रेक चार-पाच दिवसांत सहज होऊ शकतात. झालंच तर आसपास जाऊन पालमपूरचे चहाचे मळे, कांगरा फोर्ट, चामुंडा देवीचं आणि बैजनाथचं मंदिर पाहू शकता. वेगळं काही पाहायचं असेल तर धरमशालेजवळ क्रिकेटचं मोठं स्टेडियमदेखील आहे. इथून सुमारे दीड तासावर असणारं मसरूरचं रॉक टेंपल न चुकवण्यासारखं आहे. वरवर पाहताना हे साधे दगड वाटले तरी एका पूर्ण भीमकाय पाषाणातून पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी हे मंदिर कोरून काढलंय. मंदिरालगतच सुंदरसा तलाव आहे आणि पलीकडे पुन्हा जिथून तिथून दिसत राहणा-या धवलधार पर्वतरांगा आहेत. या मसरूर रॉक टेंपलला युनेस्कोनं जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मंदिराकडे सरकारचं आणि पुरातत्त्व खात्याचं फारसं लक्ष नसल्यामुळे मंदिराची पडझड होत चाललीय. अस्सल ट्रेकर आणि शांततेच्या शोधात असणारा पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या फिरस्त्यांसाठी अशाप्रकारे धरमशाला हे एक उत्तम ठिकाण आहे.
this article previously published in:-
http://www.prahaar.in/madhyantar/madventure/22100.html

Friday, April 1, 2011

क्रिकेट...दिवाना बना दे !

मुंबईची हवा तशीही दरवर्षीपेक्षा यंदा जरा जास्तच गरम आहे आणि त्यात क्रिकेट फिवरनं भर घातलीयं. उद्या या सर्व जल्लोषाचा कळस होणार आहे. उद्याचा सामना पाहायला मिळावा म्हणून हर तऱ्हेचे प्रयत्न केले जाताय. सट्टेबाजी तर आहेच त्याच्या बरोबरीने तिकिटांची सौदेबाजी देखील जोरात चाललीयं.एकूणच भारतीयांचं क्रिकेट आणि सिनेमाचं खूळ कोणत्याही टोकाला जाऊ शकतं हे खरयं. अगदी जन्माला आल्यापासूनच बाळगुटीऐवजी भारतीयांना क्रिकेट आणि सिनेमाचं आसव पाजलं जातं की काय असा कोणीही बाहेरच्या माणसानं विचार करावा अशा प्रकारे प्रत्येकजण आपापलं ज्ञान पाजळत असतात. ते काहीही असलं तरी आपण सच्च्या दिलानं एन्जॉय करतो हे महत्वाचं ! क्रिकेटर्सवर तर आपले एवढं प्रेम की त्यांचा उदो उदो करण्यापासून ते अगदी त्यांच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यापर्यंत मजल जाते. पण हेच क्रिकेटप्रेमी आता उद्या भारतालाच वर्ल्डकप मिळावा म्हणून देव पाण्यात टाकून बसतील. उद्याचा श्रीलंकेविरूद्धचा सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही आणि तसं बघता कोणत्याही संघानं हा सामना जिंकला तरी शेवटी वर्ल्डकप आशिया खंडातच राहणार यात थोडे तरी समाधान मानून घ्यायला हरकत नाही. तेव्हा उद्याच्या सामन्यासाठी  सर्व भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा :)

Wednesday, January 5, 2011

वन शिक्षण..जन शिक्षण

                         
                           

२०११ वर्ष नुकतेच सुरू झालंय त्यासाठी आमच्या सर्व ब्लॉगर मित्र-मंडळीना शुभेच्छा. हे २०११ साल 'आंतरराष्ट्रीय वन वर्ष' म्हणून युनेस्कोने जाहीर केलंय. त्याच निमित्ताने एलआयसीने यावर्षी काढलेल्या एका अतिशय सुंदर कॅलेंडरमधले आपल्या देशातल्या १२ राष्ट्रीय अभयारण्यांचे अप्रतिम फोटो माझ्यातल्या निसर्गाप्रेमीला खुणावतायत. हे पाहून मन सारखं जंगलाकडे धाव घेऊ पाहतंय. मागल्या वर्षी मध्याप्रदेशमधले बांधवगढ आणि कर्नाटकातले नागरहोले नैशनल पार्क पायाखालून घातलंय. तसे त्याआधी उत्तरांचलचे जिम कॉर्बेट नैशनलपार्क देखील पाहून झालंय. पण अशा जंगलांमध्ये कितीही वेळा गेले तरी न भरणारे हे मन आणि न थकणारी हि पावले आहेत तोपर्यंत अश्या रानबुलाव्याना मन साद देतच राहणार. भारतामध्ये काही ठिकाणी वनांची आणि त्यामधल्या वन्यजीवांची सध्या काय विदारक अवस्था आहे हे सांगायला केवळ जयराम रमेश पुरे पडणार नाहीयेत तर त्यासाठी आज वन आणि वन्यजीव संरक्षणविषयक जागृतीची आणि सरकारी प्रयत्नांची खरे तर सर्वात जास्त गरज आहे. आजमितीला देशातल्या कित्येक जंगलांमध्ये कितीतरी वनरक्षकांची पदे अपुरे पगार आणि योग्य त्या सोयी मिळत नसल्यामुळे रिक्त आहेत. अशा काही त्रुटींची सरकारकडून दाखल घेतली गेली पाहिजे. कारण केवळ जनजागृती करून वने वाचणार नाहीयेत त्यासाठी सबळ कायद्यांची आणि अधिकाधिक सरकारी ( कागदावर न पडून राहण्याऱ्या ) योजनांची गरज आहे. असो, आपण सर्व प्रयत्न करत राहू आणि देशातल्या, राज्यातल्या निसर्ग,वन संवर्धनाला हातभार लावू यात. happy forest year 2011 :) save forests! save earth !