When I reached there, I realized that why some trips have tags of 'must go'. Kisama is the wonderland where the Hornbill festival takes place. There are lot's of activities to attend, lot's of things to see and many ways to understand the Naga culture. It was all travelling solo down the hills and through the hilly town of Kohima. Fortunately I stayed at the upper side of Zakhama hills and there I saw the stunning view from hills and kohima city at very long distance. Hornbill Festival is one of the most celebrated tribal festival of India, which has helped tremendously to give Nagaland it's deserving attention and recognition from India and the world.
I believe in no deadlines..but I believe in songlines..my dreaming tracks,so most of my blogs are emerging from deep down through my memory lanes. my writings are mainly based on my travel and journey findings, that includes nature,places,people,wildlife,birding,photography and almost everything I had sensed while travelling.
Translate
Showing posts with label hornbill festival. Show all posts
Showing posts with label hornbill festival. Show all posts
Friday, December 21, 2018
Of feathers, neck pieces and dancing hills
Friday, September 25, 2015
वाघ आहे म्हणूनच..
रणथंबोरच्या जंगलात तळ्याकाठी ती चार रुबाबदार पिल्लं, (खरं तर वाघाचे बच्चे, कारण साधारण एक वर्षाचे झाल्यावर वाघाचे बच्चे हे गोंडस पिल्लं वगैरे म्हणण्याला लायक राहात नाहीत. कारण त्यांच्यातला देखणा वाघ आकार घेत असतो.) त्यांच्या तेवढयाच उमद्या दिसणा-या, आईभोवताली खेळत होती. काही प्राणी पाहिल्यावर आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. वाघ हा त्यातलाच एक.
वाघाचं दर्शन हे खरोखरीच सुखावणारं आहे, वेड लावणारं आहे; पण म्हणून दरवेळीच हे सुख मिळेल असं नाही. त्याचं येणं हे अंगावर थरार उमटवणारं आहे. तो आला की आपल्यापुढे स्तब्धपणे पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. (अर्थात अनेक जण वाघ पाहतानाही घरात असल्यासारखी कचकच करतात ती गोष्ट वेगळी!)
वाघाच्या बछडय़ांचं ते गवतात बागडणं, आईच्या अंगावर लोळणं, तिला सतावणं, झुडपांमध्ये लपाछपी खेळणं, एकमेकांशी मस्ती करणं, पाण्यात डुबकी मारणं हे सर्व पाहताना कमालीचा थरार वाटत तर होताच; पण एकीकडे खूप वाईटही वाटत होतं.
गराडा घालून उभ्या असणा-या माणसांबद्दल अनभिज्ञ असणा-या या पिल्लांचं आयुष्य निसर्गावर नाही तर त्याच्या भोवतालच्या माणूस नावाच्या भयानक, वाघापेक्षा हिंस्त्र प्राण्यावर अवलंबून आहे हा विचार मनाला घाबरवत होता. व्हॉट्सअॅप व फेसबुकवर नेहमी एक पोस्ट वाचायला मिळते, एका चित्रात एक ग्रेट व्हाईट शार्क पोहताना दाखवलाय व त्याच्या बाजूला लहानसा दिसणारा माणूस पोहतोय.
चित्रात लिहिलंय की तुम्ही पाहताय तो जगातला सर्वाधिक हिंस्त्र प्राणी आहे व त्याच्या उजव्या बाजूला शांतपणे पोहतोय तो ग्रेट व्हाईट शार्क आहे. या संदेशामधून माणसाने आजवर जगातल्या कित्येक प्रजातींची किती अमाप हानी केलीय हे लक्षात येतं. ग्रेट व्हाईट शार्क हा समुद्रातला उत्तम शिकारी, परंतु माणूस हा त्याच्याही पेक्षा हिंस्त्र शिकारी. त्याचप्रमाणे वाघ हा जमिनीवरला सर्वोत्तम शिकारी, जंगलचा राजा, मात्र माणसाने वाघांनाच नष्ट करून त्याचा हा किताब पायदळी तुडवलाय.
‘आपण जगातले सर्व वाघ संपवलेत..’ हे वाक्य लिहिलं जाईल तो काळ फारसा दूर नाही. ३,२०० या वाघांच्या आत्ताच्या आकडयातले ३, २ चे आकडे पुसले जाऊन फक्त शून्य वाघ उरतील, त्यासाठी खूप काळ लागणार नाहीये. १९१३ सालापर्यंत आशिया खंडात एक लाखाहून अधिक वाघ होते, यावर विश्वास बसणं आताच्या पिढीतल्या कोणाहीसाठी कठीण आहे. मागील शंभर वर्षात ९७ टक्के वाघ विविध कारणांनी नाहीसे झाले.
आज पूर्ण जगात मिळून फक्त ३,२०० जंगलात खुले फिरणारे वाघ उरलेत. त्यातील किती जण तस्करांच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहेत हे माहीत नाही. हा आकडा खूपच भयावह व दुर्दैवी आहे. नुकताच जागतिक वाघ दिवस जगातल्या अनेक ठिकाणी, अनेक संस्थांनी विविध कार्यक्रम करून साजरा केला.
२०१० साली सेंट पीट्सबर्ग टायगर समिटमध्ये ग्लोबल टायगर डे दरवर्षी २९ जुलैला असेल, अशी घोषणा करण्यात आली. खुल्या जंगलात राहणा-या वाघांना अधिक संरक्षण मिळावं, त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी हा दिवस ठरवण्यात आला आहे. यंदा फक्त ३,२०० वाघ या दिवसाचे मानकरी होते.
आपण भारतीय त्यामानाने सुदैवीच म्हणायला पाहिजेत की आज इथे आपल्या मुलांना दाखवण्यासाठी जंगलांमध्ये थोडे तरी वाघ शिल्लक आहेत. किंबहुना भारतीय पर्यटनाला ‘ग्लॅमर’ मिळवून दिलं ते वाघांनीच. ‘इन्क्रेडिबल इंडिया टुरिझम’च्या महसुलातील अत्यंत महत्त्वाचा वाटा वाघ उचलतो.
तसे वाघ रशिया, चीन, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, कंबोडिया, म्यानमार, दक्षिण कोरिया, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम व भूतान येथे देखील आहेत. पण जगात इतर कोणत्याही देशापेक्षा जंगलात मोकळ्या फिरणा-या वाघांची संख्या आपल्या देशातच जास्त आहे त्यामुळे साहजिकच वाघ या दुर्मीळ ठरलेल्या प्राण्याला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांना इथे यावं लागतं.
मात्र ही स्थितीदेखील फार दिवस टिकेल याची शाश्वती नाही. याचं कारण आपल्याकडचं वाघांच्या अवैध शिकारीचं प्रमाण. अर्थात, या सर्वात सकारात्मक बाजू म्हणजे भारत व जगातील इतर देशांमधून अनेक व्यक्ती व संस्था या वाघांचं संवर्धन व संरक्षणासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण वाघांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांच्या आजूबाजूला राहणारी माणसं व वाघांमध्ये सुसंवाद जोडला जाणं अत्यंत गरजेचं आहे. या दोघांनीही एकमेकांचं अस्तित्व आनंदाने स्वीकारून तडजोड करून राहणं आवश्यक आहे. जंगलांच्या आसपास राहणा-या या माणसांना वाघाचा थेट सामना करावा लागतो. इथे शहरात राहून वाघ बचाव
मोहिमेबद्दल लिहिणं सोपं असतं, मात्र वाघाचा वावर असलेल्या परिसरातून बॅटरी वा कंदील घेऊन चालत जाण्याचं धारिष्टय़ आपल्यापैकी शहरात राहणारे किती जण दाखवू शकतात? त्यामुळे वाघांच्या संवर्धनाचे उपाय सांगताना, ते प्रत्यक्षात आणताना फिल्ड वर्क, तिथल्या लोकांशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आज जगातील कित्येक नामवंत मंडळी, मोठया संस्था या वाघांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. भरपूर पैसा ओतत आहेत. पण फक्त म्हणूनच वाघ जिवंत आहेत असं नाही, तर वाघांसोबत प्रत्यक्ष जंगल शेअर करणा-या माणसांमुळे देखील ते जिवंत आहेत.
वाघांच्या नष्ट होण्यामागील एक मोठं कारण म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होणं हे आहे. वाघांसाठी जंगलच उरलं नाही तर त्यांचं आसरा व खाद्याविना नष्ट होणं हे स्वाभाविकच आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी आवश्यक जैविक साखळी तिथं प्रत्यक्ष राहणारा माणूस टिकवतो. तिथला वनाधिकारी टिकवतो. जंगलासाठी महसूल उत्पन्न करणारा पर्यटक टिकवतो.
तिथले (शिका-यांची नजर न पडलेले) प्राणी टिकवतात. वाघ नाहीसे होण्यासाठी वातावरणातील बदल हे सुद्धा मोठं कारण ठरलं आहे, विशेषत: पश्चिम बंगालमधील सुंदरबनातील वाघांवर याचा जास्त परिणाम होतो आहे. आज सुंदरबनात वाघ पाहायला मिळणं अत्यंत कठीण आहे. तिवरांच्या जंगलाचा नाश, तसंच पाण्याची वाढती पातळी अशा काही कारणांमुळे इथे वाघांची संख्या कमी होते आहे.
आज वाघ आययूसीएन संस्थेने रेड लिस्टमध्ये दुर्मीळ या प्रकारात समाविष्ट केला आहे. उद्या तो अत्यंत दुर्मीळ, त्यानंतर नामशेष अशा प्रकारांमध्ये जायला वेळ लागणार नाही. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे वाघाच्या नामशेष होण्याची वाट पाहणारे देखील जगात लाखोंनी आहेत. याला कारण वाघाच्या शरीराच्या भागांची तस्करी, वाघाच्या शरीराचे मिशांपासून ते नखांपर्यंत सर्व भाग अवैधरित्या खरीदले जातात व उपयोगात आणले जातात. हा व्यापार खूप मोठा आहे आणि वाघांच्या या घटत्या संख्येचंही ते एक मोठं कारण आहे. वाघाच्या शरीराचे भाग लाखो रुपये देऊन काही श्रीमंत ग्राहकांनी संग्रहात ठेवलेले आहेत. जसजशी वाघांची संख्या कमी होते आहे तसतशी या ‘अमूल्य’ संग्रहाची किंमत वाढते आहे. त्यांच्या नामशेष होण्यावर सट्टा लावणारे देखील आहेत. नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हल साजरा होतो,
मात्र हे पक्षी अति शिकारीमुळे तिथून नाहीसे झालेत. आता हॉर्नबिल पक्ष्यांची निशाणी फक्त तिथल्या लोकांच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये उरली आहे. या पक्ष्यांप्रमाणेच वाघांवरही अशी वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा वाघ फक्त दिवाणखान्यातील त्याचं कातडं, त्याच्या अंगापासून बनवलेली औषधं, दागिने, कपडे अशा वस्तूंमधून उरेल.
सुदैवाने भारतीयांवर अजून अशी वेळ आलेली नाहीये. आपल्या जंगलांमध्ये वाघांचा मुक्त संचार आजही आहे. परंतु आज प्रत्येक वेळी भारतीय जंगलांमध्ये मुक्त संचार करणारा वाघ पाहिल्यानंतर हा थरार, हा रोमांच पुन्हा एकदा अनुभवता येईल की नाही, असा प्रश्न मनात उभा राहतो.
Thursday, April 23, 2015
सहप्रवासी
प्रवासाची खरी गंमत येते ती सहप्रवाशांसोबत. मग ते अनोळखी असोत किंवा ओळखीचे. थोडय़ाच काळासाठी आपले अनुभव, आपली सुख-दु:खं त्यांच्यासोबत वाटून घेताना आपण त्यांच्याशी दीर्घकाळाचं नातंच जणू जोडत असतो.
आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की ‘केल्याने देशाटन, मनुजा येतसे शहाणपण’, अर्थात ही संस्कृत आधारित म्हण आहे. तिचा अर्थ असा की अगदी प्राचीन काळापासून प्रवासाचं, त्यातून मिळणा-या ज्ञानाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनाही माहीत होतं. त्या काळी अनेक साधू-तपस्वी हे एकतर एकटयाने भ्रमणाला बाहेर पडत किंवा त्यांच्यासोबत त्यांचा शिष्यगण असे.
इतिहासाची पानं उलटली तर अनेक संशोधक हे असे फिरस्ते असल्यामुळेच त्यांना देशोदेशींची माहिती मिळालेली दिसते. इब्न बतुता, हुआंग झँग, असे काही विदेशी फिरस्ते तथा पंडित त्याकाळी भारतात येऊन गेले, देशोदेशी फिरले.
देशोदेशीचं नवल पाहणं हीच यांची मोठी कामगिरी असे. मग हे ज्ञान पुस्तक लिहून किंवा मौखिक गोष्टी सांगून लोकांना दिलं जात असे.
आजकाल हे काम इंटरनेट करतं. लोक प्रवासाला जाऊन येतात आणि मग त्याबद्दलच्या कित्येक गोष्टी आपल्या सग्यासोबत्यांना सांगण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अशा तऱ्हेने आजकाल प्रत्येकच जण इब्न बतुता झालेला आहे. प्रवासाला बाहेर पडण्याचं प्रत्येकाकडे वेगवेगळे निमित्त असते.
कोणी चंदरतालला ट्रेकिंग करायला जातं तर कोणी रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी जातं, कधी कोणाला बोधगयाला जाऊन भगवान गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली आत्मज्ञान मिळालं तो बोधी वृक्ष पाहण्याची उत्सुकता असते तर कोणाला महाबलीपुरमच्या मंदिरावरील अद्भुत शिल्पकला पाहायची असते. मात्र हे प्रवासाचं ध्येय निरनिराळं असलं तरी आपल्याला सतत भेटत राहतात ती माणसं.
विविध रंग, रूप, स्वभाव, भाषा यांचं मिश्रण घेऊन ही माणसं आपल्याला भेटतात आणि आपला प्रवास रंगतदार बनवतात. हाच तर कोणत्याही प्रवासाचा यूएसपी असतो. किंबहुना अशा व्यक्ती आणि वल्ली भेटल्याशिवाय प्रवासाची मजाच येत नाही. म्हणून तर कुठेही प्रवास करताना आपण सहप्रवासी कोण आहेत हे आधी पाहत असतो.
ते चांगले असतील तर पुढे सहप्रवाशांमुळे वेळ चांगला जाणार हे समजून आपला मूडही छान होतो. सहप्रवाशांशी ओळख होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यासाठी अगदी लहानसं निमित्तही पुरतं. अशीच एकदा विमानतळावर मला एक गृहिणी भेटली, तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे विमानात आपापली सीट कशी शोधायची हे तिला माहीत नव्हते (हे अर्थातच पहिल्या विमान प्रवासात मलाही माहीत नव्हतं) तेव्हा मी तिला मदत केली आणि आमची ओळख झाली. अनेकदा एकटयाने प्रवास करताना सहप्रवासी वयस्कर असतील तर ते माझ्याकडे सहानुभूतीनेच पाहतात. मी एकटीच अमुक एका ठिकाणापर्यंत कशी जाणार याची त्यांना काळजी वाटते.
तेव्हा मला गंमत वाटते व छानही वाटते. कधीकधी तर घरी यायचे आमंत्रणही मिळते एवढी छान ओळख होऊन जाते. अशाच एका विमान प्रवासात माझ्या शेजारी सुतारकामासाठी बाळगतात तशी कंतानची पिशवी घेऊन आलेला एक कामगार येऊन बसला.
खूपच साध्या कपडयातला असा तो माणूस होता. सोबत त्याचे काही सहकारी देखील होते. त्यांना कुठे बसावं हे कळत नव्हतं म्हणून ते थोडे भांबावले. मी त्यांना त्यांच्या सीट्स दाखवल्या. पण माझ्या मनातील कुतूहल शमत नव्हते. ही साधी माणसं विमानाने कुठे जात असावीत असा प्रश्न माझ्या मनात आला. कारण अजूनही खूप निकड असल्याखेरीज आपण मध्यमवर्गीय विमानासारख्या महागडया प्रवासावर पैसे खर्च करत नाही, तेव्हा ही श्रमिक माणसं विमानातून कुठे व का चालली आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं.
माझ्या शेजारी बसलेल्या कामगाराला विचारल्यावर त्याने सांगितलं की एका बडया कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दुस-या शहरात सुरू होता व तिथे त्यांना तात्काळ या माणसांची गरज होती त्यामुळे कंपनीने हा प्रवासखर्च केला होता.
काही का असेना, त्या निमित्ताने विमानप्रवास करण्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. असंच लक्षात राहिलेले एक जोडपे भेटले रामनगरला जाताना. तिथं जिम कॉब्रेट नॅशनल पार्क आहे. दिल्लीहून आम्ही रामनगरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. यातली पत्नी ही अँग्लोइंडियन होती तर पती अमेरिकन. हे दोघेही काबूल युनिव्हर्सटिीमध्ये कामाला होते.
मुलांना घेऊन ते तिच्या माहेरी शिवपुरीला चालले होते. त्यांच्याकडून अफगाणिस्तान व काबूलमधल्या ब-याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी पत्रकार असल्याचं कळल्यावर त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. मग नेहमीप्रमाणे गप्पा सुरू झाल्या. गाडी तीन तास उशिरा रामनगरला पोहोचली, मात्र त्यांच्या सहवासामुळे ते दु:ख थोडं कमी झालं.
अशी खूप मंडळी आपल्याला प्रवासात भेटत असतात. विशेष म्हणजे एखाद्या परक्या ठिकाणी भेटणारी ही मंडळी आपल्या गावातूनच आलेली असली तर त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. अर्थात हे सर्व आपल्या मनोव्यापारांशी निगडित आहे, अन्यथा आपल्या गावातली तरीही अनोळखी माणसं एखाद्या परक्या प्रदेशात भेटल्यावर आपल्याला का आनंद व्हावा हा प्रश्नच आहे.
परंतु प्राचीन काळात गटागटाने फिरणा-या आदीमानवाला त्याच्या गटातील माणसांबरोबर जी सुरक्षिततेची भावना वाटत असावी, तीच या आनंदापाठी असावी असं वाटतं. एकदा का आपला आनंद या अनोळखी मंडळींसोबत आपण शेअर केला की ती आपलीच माणसं होऊन जातात.
ही देखील समूहनिर्मितीचीच एक प्रक्रिया आहे. असाच आनंद मला व माझ्या वहिनीला, नागरहोलेच्या जंगलात फिरताना आमच्या विभागात राहणारी मंडळी भेटल्यावर झाला होता. मग गप्पांची, खाण्यापिण्याची देवाणघेवाण झाली. जंगलात फिरण्याचा आनंद द्विगुणित झाला. मात्र प्रत्येकच वेळी असा अनुभव येतो असं नाही. माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात.
कोहिमाजवळच्या किसामा गावात हॉर्नबिल फेस्टिव्हलमध्ये फिरताना अचानक माझ्या समोर िहदीमिश्रित मराठीत बोलणारी मंडळी आली. मी उत्सुकतेने त्यांची चौकशी केली, तर ही माणसं मुंबईहूनच आली होती. पण त्यांनी पुढे बातचीत करण्यात काही स्वारस्य दाखवलं नाही.
धागा न जोडताच तो तोडून ही माणसं गर्दीत मिसळून गेली. पण माझ्यासोबत काही स्थानिक माणसं होती, त्यांच्यामुळे मुंबईच्या माणसांनी पाठ फिरवल्याचं काहीच वाटलं नाही. अशा निरुत्साही लोकांमुळे आपण आपल्या आनंदाला कधीच दूर करू नये.
ही प्रवास आणि आयुष्यातली एक समानता आहे, कितीही वाईट अनुभवांनी आपलं जीवन झाकोळलं गेलं तरी त्यांना विसरून जाऊन आपण पुढे चालत राहावं. नाहीतर जीवनातील ख-या आनंदाला आपण पारखे होतो. त्याचप्रमाणे सहप्रवासी कसेही असोत, आपला प्रवास कसा छान होईल हे आपण पाहावं.
Here is the link for published article http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=4,1508,1456,2258&id=story4&pageno=http://epaper.eprahaar.in/05042015/Mumbai/Suppl/Page4.jpg
Subscribe to:
Posts (Atom)