Translate

Showing posts with label forest conservation. Show all posts
Showing posts with label forest conservation. Show all posts

Tuesday, August 9, 2011

मनाचा वारू अफाट...जंगलात सुसाट

                                                             
एकदा का तुम्ही जंगलात पाऊल टाकलात कि जंगलाची नशा चढलीच समजा...जंगलं भासमय असतात..ती मोहात पडतात..वेड लावतात..तुमच्यावर जादुगिरी करतात..रूपं बदलतात..हे असं जंगल भटकंतीचं वेड लागलं ना कि मनुष्य नाद्खुळा होतोय बघा..मग तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा..जंगलाची साद तुम्हाला मनात ऐकू येते..त्या हिरव्यागार वाटभुली, ते कानोसे घेणं, चाहुलीवर पहारा ठेवणं, ती शोधाशोध आणि ते लपंडाव, थर्राट शिकारी आणि रात्रीच्या गप्पा..सर्वच अगदी कसे हवंहवंसं..तरी हि रान तिथे दूर...आणि इथे शहरात फक्त भास आणि श्वासच !

हा सोबतचा व्हिडिओ मी स्वतः एडिट केलाय..एडिटिंग मधली मजा आणखी काही वेगळीच असते..हे तर अगदी साधे एडिट आहे..पण जरूर पहा..मजा येईल..नक्की :)


Wednesday, January 5, 2011

वन शिक्षण..जन शिक्षण

                         
                           

२०११ वर्ष नुकतेच सुरू झालंय त्यासाठी आमच्या सर्व ब्लॉगर मित्र-मंडळीना शुभेच्छा. हे २०११ साल 'आंतरराष्ट्रीय वन वर्ष' म्हणून युनेस्कोने जाहीर केलंय. त्याच निमित्ताने एलआयसीने यावर्षी काढलेल्या एका अतिशय सुंदर कॅलेंडरमधले आपल्या देशातल्या १२ राष्ट्रीय अभयारण्यांचे अप्रतिम फोटो माझ्यातल्या निसर्गाप्रेमीला खुणावतायत. हे पाहून मन सारखं जंगलाकडे धाव घेऊ पाहतंय. मागल्या वर्षी मध्याप्रदेशमधले बांधवगढ आणि कर्नाटकातले नागरहोले नैशनल पार्क पायाखालून घातलंय. तसे त्याआधी उत्तरांचलचे जिम कॉर्बेट नैशनलपार्क देखील पाहून झालंय. पण अशा जंगलांमध्ये कितीही वेळा गेले तरी न भरणारे हे मन आणि न थकणारी हि पावले आहेत तोपर्यंत अश्या रानबुलाव्याना मन साद देतच राहणार. भारतामध्ये काही ठिकाणी वनांची आणि त्यामधल्या वन्यजीवांची सध्या काय विदारक अवस्था आहे हे सांगायला केवळ जयराम रमेश पुरे पडणार नाहीयेत तर त्यासाठी आज वन आणि वन्यजीव संरक्षणविषयक जागृतीची आणि सरकारी प्रयत्नांची खरे तर सर्वात जास्त गरज आहे. आजमितीला देशातल्या कित्येक जंगलांमध्ये कितीतरी वनरक्षकांची पदे अपुरे पगार आणि योग्य त्या सोयी मिळत नसल्यामुळे रिक्त आहेत. अशा काही त्रुटींची सरकारकडून दाखल घेतली गेली पाहिजे. कारण केवळ जनजागृती करून वने वाचणार नाहीयेत त्यासाठी सबळ कायद्यांची आणि अधिकाधिक सरकारी ( कागदावर न पडून राहण्याऱ्या ) योजनांची गरज आहे. असो, आपण सर्व प्रयत्न करत राहू आणि देशातल्या, राज्यातल्या निसर्ग,वन संवर्धनाला हातभार लावू यात. happy forest year 2011 :) save forests! save earth !